तुकोबारायांचे वैकुंठगमन की खून ?

संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते,रडणारे नव्हते.
असाध्य ते साध्य |
करिता सायास ||
कारण अभ्यास |
तुका म्हणे ||
प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !!
तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्ष करू इच्छिणारे तुकोबाराय वैकुंठाचा विचार कसा करतील ???
तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--

"सांडूनी सुखाचा वाटा |
मुक्ती मागे तो करंटा ||
का रे न घ्यावा जन्म |
काय वैकुंठी जाऊन ||
येथे मिळतो दहीभात |
वैकुंठी ते नाही मिळत ||
तुका म्हणे न लागे मुक्ती |
राहीन संगे संताचिया ||"
--संत तुकोबाराय.
पण तुकोबारायांचा खून केल्यावर भटांनी लोक देह कुठे असे विचारतील म्हणून सदेह वैकुंठी जात आहेत/ गेले असे सांगितले..त्यादिवशी धुलवलीचा (रंगपंचमी) दिवस असल्यामुळे लोक उत्सवात होते..पण ग्रेट तुकोबारायांना मुकले होते...काही लोकांनी विचारले की "तुकोबाराय वैकुंठी जाताना आम्हाला कसे दिसले नाहीत" यावर भटांनी कावा करून सांगितले की "ज्यांना दिसले नाहीत ते दोन बापाचे आहेत"
बहुजन समाज गुलामीत राहावा म्हणून मनुवादी अश्या पद्धतीने धार्मिक दह्शदवादाचा वापर करतात...
प्रसिद्ध कवी सुर्यकांतजी डोळसे म्हणतात की-
आता पाप पाप म्हणून
कुणी उर बडवू शकत नाहीत.
कुणाच्याही गाथा,
पुन्हा इंद्रायणीत बुडवू शकत नाही्त

सदेह वैकुंठाचा अर्थ
हळूहळू का होईना कळतो आहे.
तरीही एखादा मंबाजी,
जमेल तसा छळतो आहे.

खोटा इतिहास पुन्हा
कुणी लिहू शकत नाही.
आणायचे म्हटले तरी
ते विमान पुन्हा येऊ शकत नाही.
रंगपंचमी / धूळवळीच्या दिवसी मंबाभटाने तुकोबारायांचा खून केला आणि तो खुनाचा सत्य बाजू पुढे आली तर सामान्य लोक फोडून फेकतील म्हणून सदेह वैकुंठाची थाप मारली...तुकोबारायांची हत्त्या झाली म्हणून त्यांचे मोठेपण कमी होत नाही...सत्य स्वीकारा...आणि ठरवा की तुकोबारायांचा आणि त्यांचा खून करणाऱ्यांचा धर्म कसा काय एक असू शकतो...मी स्वत:ला वारकरी धर्मीय समजतो.. वाचकांनी यावर गांभीर्याने विचार करावा आणि ठरवावे की जो तुमच्या आमच्यासाठी काळा दिवस ठरला त्या दिवसी तुकोबारायांची गाथा वाचून त्यांना अभिवादन करायचं का प्रस्थापितांच्या रंगात रंग उधळून गुलामीत धुंध व्हायच !
जय नामदेवराया !! जय तुकोबाराया !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......