पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संस्कार

इमेज
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे...यादी नक्कीच लांबत जाईल. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी 'श्यामची आई' रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. रूढ अर्थाने हे लिखाण काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली. 'श्यामची आई' पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या. १९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा 'इम्

करिअर

इमेज
करिअर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजिविकेचा मार्ग. मग काही लोकांचं ‘करिअर’ असतं आणि बाकी सारे तत्सम नोकरी, धंदा करणारे सामान्यच राहतात. उदा. सचिन तेंडुलकर, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद यासारखी माणसं जे काही त्यांच्या क्षेत्रात मिळवतात ती त्यामुळे संबंधित क्षेत्रातली आदर्श होतात. मग तुम्ही आम्ही मागे का? करिअरचा नेमका अर्थ कळला तर हे कोडं सुटू शकतं. शाळा कॉलेजमध्ये असताना अमुक तमुक क्षेत्रातलं शिक्षण घेणं करिअर असतं. कॉलेजमधून बाहेर पडताच एखादी तगड्या पगाराची नोकरी मिळवणं करिअर होतं. थोडा काळ तिथे जातो न जातो तेव्हा प्रमोशनपासून परदेशातजाण्यापर्यंतचे वेध लागू लागतात, त्याला करिअरचे महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यात करिअर कुठे आहे. इथे आपणच विणलेल्या कोशातून बाहेर पडायला हवं. नेमकं आपल्याला काय हवं, हे उमजायला हवं.(हीच तर खरी गोम आहे) एखाद्या भल्या मोठ्या क्षेत्राची निवड करण्यापेक्षा आपल्याला काय करायला आवडतं, हे शोधून काढलं तर उत्तम. मेडिकलला जायचंय असं म्हणण्यापेक्षा डॉक्टर व्हायचंय की फार्मा कंपनी काढायची हे आत

सामान्य ज्ञान ....

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा १) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया २) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. ४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे. ५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक. ६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली. ७) गोवा- सिंधुदुर्ग. इतर सामान्य ज्ञान * चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे. * कॅनडा सर्वात लांब रस्ते. * जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश. * चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे. * कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे. * ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम. * भारत चहा उत्पादनात प्रथम. * बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम. * घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम. * अमेरिका मका उत्पादनात प्रथम. * सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम. * क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश. * चिली तांबे उत्पादनात प्रथम. * मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम. * कोळसा उत्पादनात रशिया

राष्ट्रसंत गाडगेबाबा

निष्काम कर्म, समाजसेवा व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे संत गाडगे महाराज हे आधुनिक संत होऊन गेले. त्यांनी माणुसकीचा संदेश देत देत स्वच्छतेचा व मानवतेचा नवा धर्म समाजात रुजवला. समृद्ध समाज घडवण्याकरिता आयुष्यभर समाजातील तळागाळातील अंध, अपंग, रोगी, दीन, दु:खी, निराश्रित, आदिवासी व दलित बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते आयुष्यभर झगडले. सेवा परमो धर्म हा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. आयुष्यभर चिंध्यांचे वस्त्र पांघरणारा, सारे गाव स्वच्छ केल्यावर तळहातावर भाकरी घेऊन खाणारा, मोठमोठ्या धर्मशाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये बांधूनही आयुष्यभर झोपडीत राहणारा, श्रमाची उपासना करायला सांगणारा, कोट्यवधी रु. च्या देणग्या लाभल्या तरी एका पैचाही मोह न ठेवणारा, आयुष्यभर कीर्तनाद्वारे गोरगरिबांना समुपदेशन करणारा... अशा या थोर निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील भुलेश्वरी नदीच्या तीरावर असलेल्या शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जाणोरकर. रंगीत चिंध्या हे त्यांचे महावस्त्र. गाडगे, काठी, कानात कवडी आणि पायात दोन प्रकारच्य

सत्य इतिहास जाणुन घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.रयतेला राजा मिळाला.ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो. भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती

आजचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद?

सध्या सगळीकडे म्हणजे आंतरजालावर सुद्धा अनेकांना म्हणजे ब्राह्मणांनाच नाही तर काही बहुजनांना उठता बसता हाच प्रश्न पडतो की आजच्या ब्राह्मणांची चुक तरी काय ? का उगाच शिळ्या कढीला उत आणुन ब्राह्मणांना त्रास देतात ? मला पण आंतरजालावर बरेच जण विचारतात अहो आत्ताच्या ब्राह्मणांनी काय चुकीचे केले आहे ? पण या लोकांनी आपली सद्सदविवेकबुद्धी थोडी जरी जाग्रुत केली तरी आजच्या ब्राह्मणांची हरामखोरी लक्षात यायला वेळ लागणार नाही. * शिवजयंतीचं उदाहरण घ्या जे स्वत: ची कामे तारखेप्रमाणे करतात ते तिथीचा आग्रह धरतात, "कालनिर्णय" क्यालेंडर वाला साळगावकर (ब्राह्मण) स्वत:चं क्यालेंडर तारखेप्रमाणे जानेवारी महिन्यात आणतो पण शिवजयंतीला मात्र तिथी चा आग्रह धरतो. * सुनिल चिंचोलकर (ब्राह्मण) नावच्या महाहरामी रामदास्याने आपल्या "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" या चोपड्यात प्रुष्ट क्र.५३ वर शाहजी राजे पण लग्नाला हजर नव्हते असा मुद्दा समोर केला आहे, आणि जर रामदास राज्याभिषेक ला हजर नव्हता म्हणुन तो गुरु नव्हता असं सांगत असाल तर आम्ही शाहजी शिवाजी च्या लग्नाला नव्हता म्हणजे

तुकोबारायांचे वैकुंठगमन की खून ?

संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते,रडणारे नव्हते. असाध्य ते साध्य | करिता सायास || कारण अभ्यास | तुका म्हणे || प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !! तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

मराठा आणि ब्राह्मण हा यांच्यातील वाद बर्याच बर्षापासून चालत आलेला आहे.अगदी शिवशाहीपासून, पण त्यात भर पडली ती शाहू महाराजांच्या काळात आणि मग ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वादाला सुरुवात झा्ली.हा वाद असाच चालू आहे आजपर्यंत आणि चालूच राहील यात दुमत नाही.ब्राह्मण मराठा वाद तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत एकाचातरी अंत होत नाही आणि मराठ्यांचा अंत तर मोघल, तुर्की, अदिलशाही, निजामशाही सुद्धा करू शकले नाहीत तेंव्हा इथे तसा विचार देखील करणे म्हणजे आतातायीपणाच ठरेल.ब्राम्हण समाजाने जी जातीवाव्स्थेची मुळे खुप आधी पेरली आहेत त्याचा त्रास आजही काही समाजांना सहन करावा लागत आहे त्यामुळे ब्राम्हण विरोधी वातावरण आजही अस्तित्वात आहे.मग काही लोकं कितीही ओरडली की ब्राह्मणद्वेष कमी झाला आहे तर निरर्थक ठरेल.आजही तितकाच ब्राह्मण विरोध आहे आणि आता तर खर्या इतिहास संशोधनामुळेच तर भविष्यकाळातील या वादाचे स्वरूप महाभयंकर असणार आहे यात तिळमात्र शंका नाही.खेडेकर साहेबांच्या मते मराठा - ब्राह्मण संघर्ष झालाच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे कर्त्रुत्व ब्राह्मण मान्य करणार नाहीत जे सतत जाप करत असतात की ब्राह्मणांच्या केसालाही धक

डेबुजी झिंगराजी जानोरकर

गाडगे महाराज ( फेब्रुवारी २३ , १८७६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. अनुक्रमणिका  [ लपवा ]  १ बालपण २ सामाजिक सुधारणा २.१ "संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " ३ संक्षिप्त चरित्र ३.१ संकिर्ण बालपण [ संपादन ] गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. सामाजिक सुधारणा [ संपादन ] १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की,

गाडगे महाराज

"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू  नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दिन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव.या देवांतच गाडगेबाबा अधिक रमतअसत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव नावाच्या खेड्यात २३ फेब्रुवारी सन १८७६ रोजी गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव ''डेबूजी" असे ठ्वले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वड

सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय......

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... एरव्ही बोललेही नसते, पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय. चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय. जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता. खरे दु:ख याचे की, तुम्ही मला गृहित धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय.. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात, त्याच बेईमान झाल्यात. असे होईल,मला काय माहित? मला कुठे पुढचे दिसले होते? एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलतेय? होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... ही कही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते, आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे. म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानीहे गार्‍हाणे घालतेय. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... मावल्यांनो,लेकीब

'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्य

भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.??

  तुमचा आणि आमचा शिष्टाचार असतो. अशी कविता शाळा-कॉलेजात भविष्यात शिकवली जाणार की काय? असं वाटू लागलंय. कारण टी.व्ही लावला की भ्रष्टाचाराची बातमी, सकाळी पेपर चाळला की भ्रष्टाचाराची बातमी. एखाद-दुसर्‍या दिवशी भ्रष्टाचाराची बातमी ऎकली किंवा वाचली नाही तर मन अगदी अस्वस्थ होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे भ्रष्टाचार आणि भारतीय माणसाचे नाते इतके घट्ट झाले आहे की सोडता सोडवेना. मुळात भ्रष्टाचार हा विचारांतून जन्माला येतो आणि मग तो कृतीत उतरतो. स्वतंत्र भारतातील पहिला वैचारिक भ्रष्टाचार गांधी-नेहरुंनी केला. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रधानमंत्री पदासाठी लोकशाही मार्गाने बहुमताने निवडून आले होते. तरी आमच्या महात्मा गांधींनी नेहरुंना पंतप्रधान पद दिले. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार होता. आज चीन आणि काश्मीरसारखा न सुटणारा प्रश्न आपल्याला नेहरुंच्याच कृपेने मिळाला आहे. पुढचा सर्वात मोठा वैचारिक भ्रष्टाचार नेहरुंनी केला. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होणार होतं. परंतु वंदे मातरमला चाल लावणे कठीण आहे व ते बॅंडवर वाजवता येत नाही म्हणून वंदेमातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही, असे नेहरु म्हणाले. का

गरीब मुलगा.............

शाळेने पत्रक काढलं,'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे,तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल! आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.गरीब मुलगा शोधायचा कसा?आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं,तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती.तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे." मुलांनी एक