पोस्ट्स

मार्च, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई-वडील...

आई-वडील.... बस शब्दच संपतात माझे हे दोन शब्द ऐकल्यावर , उर भरून येतो त्यांच्या आठवणी मनात दाटल्यावर . पर्वता सारखे वडील तर नदी सारखी आई , त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही. आई निर्मल पवित्र तर गंभीर अन संयमी पिता , वडील पुरण वेद तर आई साक्षात गीता . मुलांचा आनंद हा त्यांना पर्मानंदाचे सुख देतो , पण हा मुलगा त्यांना वृद्धाश्रमात नेऊन आपली जबाबदारी झटकून देतो . हि मुले आयुष्यातल्या सुखांमध्ये आई वडिलांना विसरतात , ज्यांनी बोटाने धरून पायावर उभे केले त्यांचा हात धरायला कचरतात . "आमच्या साठी काय केल?","हे तर तुमचे कर्तव्य होत !" असे म्हणून दाखवतात , पण बोचऱ्या शब्दांच्या वेदना फक्त आई-वडील बनल्यावरच जाणवतात . कितीही मोठे झाले तरी ते तुम्हाला लहान म्हणून पाहत असतात , लाचारी म्हणून नाही तर फक्त प्रेमापोटी ते तुमच्याबरोबर राहत असतात. आई-वडील खरच इतके महान आहेत , देव शिक्षा करेल मुलांना म्हणून ते बोलतात "ते तर अजून लहान आहेत.! "

वडील !!!

बालपणाला बाय करुन निघाले जेव्हा.. पैजण पाउले अंगणी थबकली तेव्हा... गहीवरल्या दाराला.. खिडकिचा आडोसा होता डबडबत्या पापण्यातुन मायेचा कवडसा होता. माझ्या लाडक्या लेकराला " जपा " फ़क्त एव्हढच म्हणालात तेव्हा तुम्ही पप्पा.. पाठिवर हात थरथरत होता... रडता रडता सुध्दा तुम्ही माझेच डोळे पुसत होता. . सांगत होता तरीही " आठवण नको काढुस,... भुतकाळासाठी कधी नको रडुस, स्वतंत्र व्यक्ती तु,... वेगळे तुझे " आकाश " काळजी नको करुस.. आम्ही सुध्दा राहु इकडे झक्कास " !! आठवत राहते पप्पा नेहमी तुमच्या सार्‍या गप्पा करुन घेतलेली १ Aug च्या भाषणाची तयारी..!! आणि पहिल्यांदा सायकल शिकवली तेव्हाची भरारी.. रागवायचे तेव्हा नजर तुमची करारी...!! कसं विसरु सारं थांबत नाही हे बरसतं पाणी खारं... एकदा विचारेन म्हणते देवाला.. मुलीच्या हातात का समाजाने बापाचा " कणा"द्यावा.. त्यालाच का लेकराच्या ताटातुटीचा शाप द्यावा.. कशी होउ उतराई... मनातुन काही जात नाही.. प्रयत्न मात्र नक्की करेन... तुम्हाला अभीमान वाटेल असे काही करुन दाखवेन.. तेव्हा देवालासुध्दा वाटावे.. एक जन्म तरी मुलीचा बाप व्हा

एक वडील............

ते एक वडील असतात... आई प्रेमाची नदी तर, वडील सागर असतात खारट पाणी असूनसुद्धा ,सर्वाना समावून घेत असतात घरातल्या सर्वांवर त्यांची, करडी नजर असते मुले घरी वेळेवर नसली तर, गच्चीतच त्याची मूर्ती उभी असते पोरांनी खूप मोठे झालेले पाहणे, हे त्याचे स्वप्न असते त्यासाठी घरदार सोडून पळण, त्याच्या जिवालाच माहिती असते नसेल प्रेम दाखवत तरी ,आतून वाहता झरा असतात पोर जेवली का विचारल्याशिवाय ,ते ताटाला हात लावत नसतात शाळा कॉलेज च्या प्रवेशासाठी, घाम टिपत रांगेत तेच उभ असतात पैशाची जमवाजमव करत, तुटकी चप्पल पुन्हापुन्हा शिवत असतात पोरग शाळेत जाऊ लागले कि, त्याला सायकल हवी असते थोडी वरची पायरी चढल्यावर, त्याला बाइक नवी लागते वडील आपल अजूनही ,बसच्या मागे पळत असतात पोर नोकरीला लागल्यावर, आता चार चाकीच घेईन म्हणतात मुलांची लग्न झाल्यावर, स्वेच्छा निवृत्ती घेईन म्हणतात मुले नातवंडे परदेशी गेल्यावर रिकाम्या घरात, नोकरीला गेलेलेच बरे म्हणतात चारचौघात कोडकौतुक करणार, ते एक वडील असतात आई समईतील ज्योत, तर जळणारी फुलवात वडील असतात

बायको म्हणजे

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते कधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते || ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही, ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही || पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजा-याला तीच व्यवस्थित हाताळू शकते. || घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे? बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे? कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे? सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते || आला गेला पै पाहुणा, सर्वांचच ती मनापासुन स्वागत करीत असते कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट, कोण भला प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत असते || मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा, तीच अटेंड करत असते विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य, देणी-घेणी अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत असते || सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ, नणंदा आणि वहिनी सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते || सर्वांशी गोड बोलुन चांगुलपणा मी घेतो, नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन वाईटपणा ती घेत असते || वाहन मी चालवत असतो, शेजारी ती बसलेली असते, घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे, सतत मला ती सांगत असते || म्है

श्रद्धा अंधश्रद्धा १ते ५ भाग एकत्र

वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. . मस्त गार वारे सुटले होते तरी त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने घड्याळात पहिले. सव्वा बारा, धक्का बसून त्याने पुन्हा घड्याळ पहिले सव्वा बाराच वाजले होते. म्हणजे त्याला तिथं येऊन फक्त पंधराच मिनिटे झाली होती. अजून पाऊन तास त्याला तिथे काढायचा होता. मित्रांबरोबर पैंज लावली होती त्याने, 'अमावश्येच्या रात्री बारा ते एक स्मशानात थांबण्याची' आणि त्याला विश्वास होता कि हि पैंज आपण नक्की जिंकणार कारण भुताखेतांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. शहरात शिकायला गेला तेथील शिकलेल्या मित्रांच्या सानिध्यात राहून भूतं-खेतं,घुमणारे भगत, देवाचे बळी,करणी, या सर्व लोकांच्या खुळ्या समजुती आहेत. या मताचा तो बनला होता. शहरातील मित्रांबरोबर तो अंधश्

गैरसमजूती-अंधश्रद्धा रोजच्या व्यवहारात.

नमस्कार मंडळी, नुकतेच युट्युबवर एक छोटी चित्रफित पाहिली आणि हा चर्चाप्रस्ताव आपणा समोर ठेवावा असे मनात आले. अंधश्रद्धा हा फार मोठ्या परिघाचा विषय आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपला अनेक अश्या गोष्टींवर विश्वास असतो की अनेकदा ते एक 'सत्य' आहे असे आपल्याला वाटत असते. पण ते खरेच सत्य आहे की अनेकांनी अनेकांना सतत सांगितल्याने जोपासला गेलेला तो एक भ्रम आहे हे तपासून पाहायची आपल्याला कधी गरजच भासत नाही. येथे मी जो दुवा देत आहे त्यात असे दाखवले आहे की पुण्यामधल्या स्वामीसमर्थांच्या एका मठातील औदूंबराच्या झाडाला फुल आले आहे. 'उंबराचे फुल' हे अनेक वर्षांतून एकदाच उगवते, ते पराती येवढ्या आकाराचे असते इत्यादी समज त्या फुला विषयी लोकांत आहेत. आता माझ्या समजूती प्रमाणे उंबर हे अंजीर वर्गातले सदाहरित झाड आहे. त्या वर्गात वड, पिंपळ, उंबर, रबर प्लँट. अंजीर इ. नेहमी दिसणारी झाडे येतात. ते द्विलिंगी असून त्याला वर्षातून दोनदा फुले येतात आणि पुनरुत्पादन होते. त्याचा फुलोरा बहुधा अनेक लहान फुले एकत्र येणारा असा असतो. तो फुलोरा म्हणजेच ते उंबराचे फळ. म्हणजे आपण ज्याला फळ म्हणतो तो एकत्

विसरू नको रे आई बापाला

झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला माडी त्याची भारी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही हि जाण राहू दे थोडी विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बायका पोर गण गोत्र मित्र परिवार, खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाझार विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली त्याची सेवा ते मेव्ल्यारती कश्याला रे म्हणतोस देवा देवा बुन्धी लाडवाचे जेवण करुनी मग म्हणतोस जेवा जेवा विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तू समजून वूम्जून वेड्या होऊ नको अविचारी, जीवना मधली अमोल संधी नको रे घालू वाया विसरू नको रे आई बापाला झिजवल

७ मराठे वीर

कुडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कुडतोजी गुजर. यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कुडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले. बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी म

अष्टप्रधानमंडळ

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते. १) पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क

shivaji महाराज.......

शहाजीराजे भोसले पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व! जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते. फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गे

दिनू चे आई बाबा नेहमीच का दमतात?

गेले काही दिवस मी दमलेले बाबा चे विरोप न वाचता डिलीट करीत आहे. त्या पूर्वी दिनू च्या आईने मला सतावले होते. एखादा भावना प्रधान विषय एकदाच बरा वाटतो. सतत तोच विषय पुनुरावृती झाला की भावनिक काळे विरोप म्हणजे भावनेचे दबाव तंत्र सुरु होते. त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. खूप जणांनी हे दोन विरोप पाठवले. आई वडिलांच्या भावना, त्यांचे कष्ट ह्याची जाणीव मुलांना असणे गरजेचे आहे. पण आईवडील म्हणून आपणच त्यांना भावनिक दबाव तंत्राने स्वतःला त्यांच्या पुढे आपण किती थोर आहोत हे सांगत असतो. मुलांच्या मानसिक वाढीसाठी पालकांचे हे दबाव तंत्र घातक ठरते. मी आतापर्यंत हे दोन्ही विरोप अजिंक्य ला दाखवले नव्हते. काल सहज त्याने मी काय डिलीट करते म्हणून पहिले तर ही गोष्ट मी वाचतो असे म्हणाला तर मी म्हंटले ठीक आहे वाच पण तुझे मत मला जाणून घ्यायला आवडेल. त्याने त्याची जी काही मते सांगितली त्यावरून आजची पोस्ट तयार झाली. प्रथम म्हणाला दिनूची आई बद्धल सांगतो. आई अशी किती तरी घरे मी पहिली आहेत की जिथे आईचे काम केले की आई पैसे देते. त्यांचे बाबा संध्याकळी घरी आले की त्यांचा मुलगा पाणी देतो. वडील त्याला घरचा नियम म्हणून

आत्मविश्वास हीच गुरूकिल्ल

व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. त्यातून नैराश्य येते. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी उर्जा उत्त्पन्न होत असते. ही उर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. लिटल मास्टर सचिन जेव्हा पाक विरोधात प्रथम मैदानावर उतरला. तेव्हा त्याच्यासोबत नवज्योत सिद्धू मैदानावर खेळत होता. सचिन जेमतेम 16 वर्षांचा असेल, पाकिस्तानी खेळाडूच काय तर सिद्धूलाही सचिनला पाहून हसू आले होते. सचिनला पाकच्या गोलंदाजाने पहिलाच बाउंसर टाकला. सचिन जरासा चकला आणि स्वत:चे रक्षण करण्यासाठी तो खाली वाकला. सिद्धुला वाटले, काय खेळाडू पाठवलाय? याला खेळता मुळीच येणार नाही. त्याने सचिनकडे जाऊन त्याची विचारपूस केली आणि खेळू शकशील का? असे विचारले? सचिन निश्चिंत होता. काहीच न बोलता त्या

मला देव भेटला

मला देव भेटला मातृपितृ देवो भव परमेश्‍वर इकडे तिकडे कुठेही नसतो तर आपल्या प्रत्येकाच्या घरातच असतो. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परमेश्‍वर म्हणजे दुसरं-तिसरं रूप तरी काय असते? तर आपले प्रत्येकाचे आई-बाबाच तर असतात. रोज सकाळी घरातून बाहेर पडताना त्यांना भेटून व नमस्कार करून बाहेर पडतो म्हणजेच मी रोजच्या रोज माझ्या देवांना नमस्कार करून बाहेर पडतो. जर मी घरी नसेन म्हणजे कामानिमित्ताने घरापासून कुठे दूरवर असेन तर मोबाईल अथवा इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या या परमेश्‍वरांशी रोज न चुकता संपर्क साधतो अथवा संवाद ठेवतोच. लहानपणापासूनच झालेले हे संस्कार असे सहज कसे सुटतील? आपल्या घरातल्या अथवा हक्काच्या देवांना कोणी इतक्या सहज विसरतो काय? आपल्या आई-बाबांना विसरणे म्हणजे सर्वात मोठे पाप आहे. याव्यतिरिक्त आमच्या लातूरमधील लहान-मोठ्या देवळांना सातत्याने भेटी दिल्या आहेत. शिर्डी, तिरुपती अशा तीर्थस्थानांना भेटी देणे सुरूच असते, पण देवाकडून मी कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तशी ती कोणीही ठेवूदेखील नये. देवा मला तू हे दिलेस तर मी ते करीन असे गार्‍हाणे घालायची काहीही गरज नसते. परमेश्‍वर आपल्या प्रत्येक गोष्टी

लेक लाडकी .............

नवसाला माझ्या तो देव ग पावला. तयातच तुझा पोरी जनम ग झाला. संसार वेलीला माझ्या फुलोरा आला. घर – अंगण सार भरभरून ग गेला. रांगणार बाळरूप आता बसुही लागल. हाती जे येई त्यास चोखूही लागल. कौतुकान दिल तुला मुठीच खेळण. लाडे लाडे भुईवर घेतलस तु लोळण. शाळेशी जाण्या मग तु हट्ट जो केला. पोरीनं शाळेत? जन अचंबित झाला. मायेन पाटी-पेन्सिल हाती ती दिली. बघता–बघता तु पार एस एस सी झाली. वरून साजिरा राम जणू त्याची सीता तु झाली. पाठवणी पित्याचा दाटला कंठ , दु:खी माता तु केली. तु संसार केला नेटका ,झाला धन्य माझ्यातील पिता. भावंडाना लावी जीव ,जणू त्यांची दुसरी तु माता. सुगरण अन्नपूर्णा तु, तुझ्यात फक्त मायेचाच ठेवा. गुणसंपन्न लेक तु माझी ,मला वाटे माझाच हेवा. विशाल हृदय तुझे जणू सागरापरी. सदा मदतीस हजर ,जणू तु आसमानी परी. विश्वास नसे बसत ,अस जगी माणूस असतं. सार्थ अभिमान वाटे , तेही माझ्या लेकीत वसतं. पण अचानक तुझा समज असा काय झाला. लेकी तुझा प्रिय बाबा तुला अनोळखी झाला. दूर दूर गेलीस , आम्हा टाकुनी एकटी. नाही वळून पाहिलीस मागे भावंडे धाकटी. आई जणू होती तुझी पारदर्शी काचच ग. तडकली ती ,पण शेवटी नाही सावरलस ग.

निष्पाप

मुलीनंतर आता मुलगाच व्हावा. कुटुंब चौकोन परीपूर्ण व्हावा. इच्छित माझं पूर्ण झालं. देवानं तुझ्यारूपे मला दान दिल. कोवळं बाळरूप पाहून तुझ, जीवन सार्थक झालं माझं. वंशाचा दीपक आपसुक मिळाला. चिंता काळजी आता गेले तळाला. बाबांचे पाय जमिनीस ठरेनात. ताईचे डोळे भरता भरेनात. आप्तेष्ठ सारे पाहुन गेले. सदिच्छांचे चारी बाजून लागले ठेले. चोवीस तास तुझा आराम होता. भूकेचाच काय तो सलाम होता. नामकरण विधीचा तो शुभदिन ठरला. सहस्त्र जेवणाचा बेत रचला. कांही दिवस कोड कौतुकात गेले. एक दिवस साऱ्यांचे जीव आढ्याला टांगले. तुझा प्रतिसाद कांहीच नव्हता. तु फक्त मांसाचा जिवंत गोळा होता. डॉक्टर वैध्यांचे सारे यत्न झाले. आखिर यश ना कोणास आले. माझी काय बाळा चुक झाली होती. तुझी सारी गात्रं मूक झाली होती. नियतीन मोठी फसवणूक केली. स्वप्नांच्या मोत्यांची पार माती झाली. नशिबान विचित्र खेळ मांडला. बाळा तुझ्यासाठी माझा रोम रोम रडला. सुन सुन सारं जग झालं. तुझ्या काळजीन मन सुन्न झालं. बाळा तुझ भविष्य कस असेल? एक एक दिवस नरक भासेल. आता तुझ पालनपोषण हेच कर्तव्य. जरी कांहीही करावे लागेल दिव्य. आता दुःखालाच मानू खर सुख. पाहुन तुझ न

लेक लाडकी

लेक माझी लाडकी , भाग्य घेऊन आली. सुख-दु:खाच्या क्षणात,साथ मला देत गेली. आई वर जीव भारी,सर्वांची तू मोठी ताई. काही अडता-नडता , तुज कडे धाव जाई. तुज नसे कधीही,आळस कोण्या कामाचा. हसत मुख सदा राही , ठाव नसे घामाचा. आकाशी या स्थित होते,चंद्र,सूर्य अन् तारे. पण मला न कळले , कसे फिरले ते वारे. शब्दा मागून शब्द आले, वाढले दो मुखात. परिणीती मग झाली, अबोला अन् दु:खात. धन-दौलत , जमीन-जुमला, ना राही माझा-तुझा. चार दिसांच्या जीवनी या,का ही अबोलाची सजा? अखेरचे दिन आता, बघ माझे हे आले. यमराज काल मला,आमंत्रण देऊन गेले. आता एकवार तरी, जावस भेट तू देऊन. राग ,द्वेष ,अभिमान, थोड बाजूस ठेऊन. यमराजा थोपविले, दिली हजार कारणे. आता तरी भेट मला,सोड तुझे ते धरणे. वाट पाहणेची आता ,लेकी पार झाली हद्द. नेण्या स्वर्गाच्या दिशेने,चित्रगुप्त आले खुद्द. आता पर्वा ना जनांची, तोंड देईन निंदेस. पण रोकेन शिवण्या, तो पिंड कावळ्यास.

हरवलेली माणुसकी

कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास. मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस. निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई. पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई. भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला. अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला. कधी बळी जाते बिचारी अबला नार. तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार. संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही. भावाची ओळख आता भावास नाही. अविचार , स्वार्थाने भिनली जमात. माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात. नीती मूल्यांचा होई र्‍हासच जणू हा. सभोवर जनावरांचा भासच जणू हा. प्रकृतीचे हे दुष्ट स्वप्न विरून जावे. मनुष्यास माणुसकीचे आता भान याव

होळी रे होळी…

हिवाळ्यातली हाडं गोठवणारी भटकंती करता करता ऊन तापू लागले आणि रानात पळस पेटले की समजावे आता दिवसाच्या भटकंतीला आराम देण्याची वेळ आली आहे. आले आहेत, थंडीचे पानगळीचे दिवस जाऊन नवे साज घेऊन लवकरच चैत्रपालवी लवलवण्याचे दिवस. आंब्याला लगडलेल्या बाळकैर्‍या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस. सुगीची आणि खळ्याची कामं संपून घरात धान्याच्या राशी लावण्याचे दिवस. सगळे कसे नवेनवे. मग उत्सवप्रिय असलेला माणूस तरी कसा मागे राहील? अशा याच ऋतुच्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावरचा रंगीत उत्सव वसंतोत्सव. आपला शिमगा आणि होळी. पुराणकाळी भक्त प्रल्हादाच्या विनाशासाठी त्याच्याच अविचारी पित्याने, हिरण्यकशपूने त्याच्या बहिणीला, होलिकेला दिव्य अग्निरोधक शाल पांघरुन प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. पण ऐन वेळी शाल वार्‍याने उडाली आणि प्रल्हादावर येऊन पडली. होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हादाचे ब्रम्हदेवाने रक्षण केले. नंतर ब्रम्हदेवानेच हिरण्यकशपूचा नृसिंह अवतार धारण करुन वध केला. या अहंकाराच्या आणि द्वेषाच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळी (होली, होलिकोत्सव) साजरी केली जाते. फाल्गुनी पौर्णिमेला प्रती

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं

एकदा आजीला म्हणाली मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं? आपली माणसं सोडून तीनेच का परक घर आपलं मानायचं? तिच्याकडुनच का अपेक्षा जुनं अस्तित्व विसरायची तीच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सृष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून, तो येतो का कधितरी तिच्याकडे आपली वाट मोडून. तीच पाणी किती गोड तरीही ती सागराच्या खारट पाण्यात मिसळते आपलं अस्तित्व सोडून , ती त्याचीच बनुन जाते. एकदा सागरात विलीन झाल्यावर तीही सागरच तर होते. पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच नतमस्तक होतात लोकं , पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातात लोकं…………

आता तरी हसून घे

आता तरी हसून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे माहीत आसते सर्वाना फुलणारे फूल हे सुकनारेच असते किती ही ते जपले तरी कोमेजनारच असते आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे काही बरोबर आणलेल नसत काही बरोबर नेता येत नाही इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला क्षणभर सुख ही देता येत नाही देण्यात ही सुख आसते ईतके तरी समजावून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे काहीच आपल्या हातात नसत काहीच आपण करत नाही किती ही योजना आखल्या तरी तसे काही घडत नाही कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे कोणावर तरी प्रेम कर आपला त्याला मानून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे तुला काय वाट ते तूच सारे करत आसतेस नशिबात जे आसते तसेच सारे घडत असते मीळतय जे आत्ता तुला ते तर उपभोगून घे काळजी सोड नशिबवर स्वत:वर हसून घे शहाणपण ठेव बाजूला मनप्रमाणे जगून घे आजचा दिवस मि

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किंकिण कांकण रुणझून पैजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली नवऱ्यामुलाची आली हळद हि ओली हळद हि ओली लावा नवरीच्या गाली हळदीन नवरीच अंग सारं माखवा पिवळी करून तिला सासरी पाठवा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली सासरी मिळूदे तुला माहेरची माया माहेरच्या मायेसंग सुखाची गा छाया भरुनिया आले डोळे जड जीव झाला जड जीव झाला लेक जाय सासराला आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी ग पोरी सुखाच्या सरी सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली......

शोध बापातल्या 'बाबाला'

शोध बापातल्या 'बाबाला' (अनेकदा आई स्वत:च्या भावना शब्दांतून व्यक्त करते पण व...डिलांना ते फारसे जमत नाही त्यामुळे बहुतेकदा आईच सर्वश्रेष्ठ ठरली जाते पण बाबाही तितकेच महत्वाचे असतात . सायकल ,पोहणे या सारख्या गोष्टी आईपेक्षा बाबा जास्त शिकवतात ,,,पण कितीस लक्षात घेतलं जात हे ..??? त्यांच रागवण दिसत पण प्रेम करणं नाही ...विशेषता तारुण्यात प्रवेश करणारया मुलांच्या (मुलगे)नि त्यांच्या वडिलांच्या नात्य...ात दरी पडताना दिसून येते बऱ्याचदा...याच उद्देशाने मुलाना उद्देशून लिहिली आहे ही कविता ) पहिला स्पर्श तुझा, त्याला पुलकित करतो मग केवळ तुझ्याच , भविष्यासाठी जो जगतो तो बाप असतो ...!!! शब्दांत व्यक्त होण जमत नाही ज्याला तू आजारी असताना वेदना होते पण काळजाला कारण तुझीच चिंता असते रे बापाला ...!!! नापास झाल्यावर दिलाही असेल जरी पाठीत धपाटा सांग पण त्याने कधी झाला का रे तुझा तोटा ..??? म्हणूनच बापाला समजू नकोस 'छोटा' ...!!! पहिला आलास शर्यतीत तेव्हा 'माझा छावा 'म्हटला असेल खुशीने त्यानेच नाही तुला, सायकल शिकवली मोठ्या हौशीने तू होताना 'पुरुष' धीर दिलाच असेल 'न

रंगपंचमी !!

लाल,गुलाबी,निळा ,पिवळा राधे यात तुझा रंग खुळा ये अशी भिजून जा माझ्यासवे रंगवतोय तुझ कृष्ण निळा ...लपशील अशी कुठवर सखे न खेळता होयील विरंगगुळा नको करू वोढाताण अशी तुटून जायील तो हिरवा चूडा जा कृष्णा मज नको छेडू तू निळा माझा रंग गोरा गोपिका माझ्यासंगे आम्ही जिरवू तुझा तोरा उधळू रंग असे कृष्णा तू करशील पोबारा रंगणे तुझे आम्हाकडून बघेल गोकुळ सारा जा जा राधे तू पळशील कुठवर आज ना सोडणार तुला प्रेम रंगाचे रंग घेवून मी ये अशी झुलवू हा प्रेम झुला ना ना कृष्णा तू सोड मला पहा नको करू हा गुन्हा राहू दे प्रेम रंग असाच आपला मी गोरी राधा तू निळा कान्हा.

पण जीव तरीही जडतातच न

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण तरीही डोळे भरतातच ना? "अपेक्षाच करू नये अश्या" पण अपेक्षा तरीही उरताताच ना? सगळ्या हाती उरायचे शुन्यच पण जीव तरीही जडतातच ना? हिशेबच मांडायचा सगळा तर आकडेही पडतील कमी तरीही सुख मोजतांना पापण्या तुझ्याहि भिजतातच ना? सगळ्या हाती उरायचे शुन्यच पण जीव तरीही जडतातच ना? लाख असेल झाला दगड तुझ्या काळजाचा पण झिडकारतांना हात माझा मनात वेदना असतातच ना ? सगळ्या हाती उरायचे शुन्यच पण जीव तरीही जडतातच ना?

जाणीव

खिडकी पाशी उभी राहून .. आकाशातले चित्र विचित्र तुकडे न्याहालताना जाणीव होते .....हातुन काहीतरी निसटत चालल्याची माझ्या वाट्याला आलेल्या मानासंच्या सौम्य सुखदायी आठवनी आठवताना जाणीव होते .... .ती मानसाच माझ्यापासून दूर होत चालल्याची रक्ताची नाती नसताना जे बंध घट्ट होते ........ आता जाणीव होते ......ते बंधच सैल पडत चालल्याची मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले क्षण एकांतात हलुवारपने कवटालताना जाणीव होते .....ते क्षणच पुसट होत चालल्याची मनात ओढ़ ही असल तर भेट ही घड़तेच पण आता जाणीव होते....... प्रत्येक भेटीतील ओढ़ कमी होत चालल्याची मनावरच्या खोल जखमांवरची खपली काढताच ती भला भला वाहू लगते अणि मग जाणीव होते .....ही खपली कधी भरलीच नव्हती याची उद्याचा दिवस कधी उगवेल या प्रतिक्षेत आजचा दिवस कधी मावालतो हे कलताही नाही अणि मग जाणीव होते ......हे दिवस ही हातुन सुटत चालल्याची ज्या आधाराची मला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर गरज होती आता जाणीव होते .......तो आधारच खुप दूर गेल्याची कधी कधी हे आयुष्य माणसाला कसे एकटे पाडते याची प्रचिती येत असतानाच जाणीव होते .......आपण ही फक्त एकाकी पडल्याची

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी.

या सुंदर जीवनात कधी कधी...पडायच असत प्रेमात कधी कधी... बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी... पाहताना त्याच्याकडेच दाखवायच असत...... विचारात गुंतल्यासारख कधी कधी... अन पाहताना त्याच्याकडेच विचारात गुंतायच असत कधी कधी... रात्री पहायची असतात स्वप्ने त्याचीच... जागुन अशी रात्र काढावी कधी कधी... नंतर "जागला होतास का रात्री?" म्हणून विचारावे कधी कधी... मागायचा असतो देवाकडे... हात त्याचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या विषय त्याचा निघाल्यावर कधी कधी... असते रागवायचे लटकेच "अस काही नाहिये" म्हणून कधी कधी... विरहात त्याच्या... असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी... पाहुन हात त्याच्या दुसर्žया हाती... असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी...

जीवनाचे कोडे

जन्माला आला आहेस थोड जगुन बघ..! जीवनात दुःख खुप आहे थोड सोसून बघ..! चिमुटभर दुखानी कोसुनं जाऊ नकोस ..! दूखाचे पहाड़ चडून बघ ..! यशाची चव चाखून बघ ..! अपयश येते निरखून बघ ..! दाव मंडन सोपे असत जीवनाचे घोडे खेचून बघ ..! घरटे बंधने सोपे असते थोडी मेहनत करून बघ ..! जगन कठिन असत मरण सोपे असत डोन्हितल्य वेदना ज़ेलून बघ ..! जीने मरने एक कोड असते जाता जाता एवढ सोडवून बघ ..!

जीवनाच्या प्रवाहात

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला साथ देतात काही सांडून जातात........ काही दोन पावलेच चालतात, आणि कायमची लक्षात राहतात, काही साथ देण्याची हमी देऊन, गर्दीत हरवून जातात........ नाती जपता जपता तुटणार नवीन नाती जुळत राहणार, आयुष्य म्हटले तर, हा प्रवाह असाच चालत राहणार........ पण् कुणी दूर गेले तर जगणेही थांबवता येत नाही, कारण ह्या अथांग सागरात एकटे पोहताही येत नाही....
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावी आपणही मग तिच्या खांद्यावर हात टाकून तिला एक गंमत सांगावी खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी लटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावी आणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... आपले सगळे सिक्रेट जाणणारी जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावी आई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी.... अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावी हातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावी अन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाही अधिक जवळची व्हावी

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! तिचं बोलणं, तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असणं; जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं; अचानक स्वप्नात दिसणं ! खटयाळ पावसात चिंब न्हायचं ! माझं काय, तुमचं काय प्रेमात पडलं की असच व्हायचं !! केसांची बट तिने हळूच मागं सारली ... डावा हात होता की उजवा हात होता? आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण, मनात आपल्या साठवतो ती रुमाल विसरुन गेली ! विसरुन गेली की ठेवून गेली? आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो ! आठवणींचं चांदण असं झेलून घ्यायचं ! माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! तिची वाट बघत आपण उभे असतो ... ठरलेली वेळ कधीच टळलेली ! येरझारा घालणंसुद्धा शक्य नसतं रस्त्यावर! सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !! माणसं येतात, माणसं जातात आपल्याकडे संशयाने रोखून बघतात! उभे असतो आपण आपले मोजीत श्वासः एक तास ! चक्क अगदी एक तास !! अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते ! अखेर ती उगवते !! इतकी सहज! इतकी शांत ! चलबिचल मुळीच नाही ! ठरलेल्या वेळेआधीच आली होती जशी काही !! मग तिचा मंजुळ प्रश्नः "अय्य

मराठी कविता माझे वडील (बाबा

आईचं गुणगाण खुप केले पण बिचा-या बापाने काय केले? बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी आपण फक्त गातो आईचीच गोडवी आईकडे असतील अश्रुंचे पाट, तर बाप म्हणजे संयमाचा घाट. आठवते जेवण करणारी प्रेमळ आई त्या शिदोरीची सोय ही बापच पाही.... देवकी - यशोदेचं प्रेम मनात साठवा टोपलीतुन बाळास नेणारा वासुदेवही आठवा रामा साठी कौशल्येची झाली असेल कसरत पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ काटकसर करुन मुलास देतो पौकेटमनी आपण मात्र वापरे शर्ट-पॅन्ट जुनी मुलीला हवे ब्युटीपर्लर, नवी साडी घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न बापाला दिसते मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न मुलाच्या नोकरीसाठी जिना चढुन लागते धाप आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा त्यांनी समजुन घ्यावं, हीच माफक इच्छा..!!

वेडया आशेने

कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने तसा डोक्यावरचा सुर्य होताच तिच्या साथीला जणु तो साथ देत होता तिच्या संथ गतीला तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाच उमगले आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली पावसाच्या नुसत्या कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत होऊ लागली तिला वाटल पावसाच्या आगणित सरी तिच्यावर कोसळणार अन.. मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळानार पन....तो मात्र तिला नुसतीच आशा दाखऊन परतला ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला डोळयातुन तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले त्या थेंबाणी मुळे जनु सारे आसमंत उजळले ती शुन्य नजरेने तिच्या वाटेकडे पाहु लागली थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली अन...ति पुन्हा एकटिच चालु लागली

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते

ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का? तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते... ती: तू रोज कविता का करतोस? तो: मनातल सगळ सांगण्यासाठी... ती: मग कवितेत का रडतोस? तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी... ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ? भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध... तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी... शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ... ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता ? तो: आहे कोणीतरी ... जी माझी असून हि माझी नाही... ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी? राहते रे कुठे? तो: दिसते ती परी सारखी, अन राहते...... हम्म्म्म..... राहते माझ्या हृदयात... ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग... पण फुकट पकावू नकोस .. तो: चालेल सांगतो, पण तू आता रागाऊ नकोस... ती आहे परी सारखी , फक्त माझ्यशीच बोलणारी... मनातल सगळ काही फक्त मलाच येऊन सांगणारी... दररोज मला

प्रेम काय असत?

एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत? देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये. ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल, पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल , जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला , तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , "हेच आहे प्रेम" जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत . तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....

ेप्रेमाचा अर्थ

सकाळी डोळे उघडण्या पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ....ते प्रेम आहे मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ...ते प्रेम आहे भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते... ते प्रेम आहे जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते...ते प्रेम आहे स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता .....ते प्रेम आहे जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही.... ते प्रेम आहे कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते.. ते प्रेम आहे जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ....ते प्रेम आहे हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली... ते प्रेम आहे.