new man akshay virulkar blog love


काल पाकिस्तान टीम
आपल्याला सेमी फायनल मध्ये भिडली ..
आपल्या टीम इंडियाने
पाकड्यांना धूळ चारली ...
धुमधडाक्यात सेहवागने सुरवात केली..
उमर गूल ची त्याने चांगलीच खरडपट्टी काढली ..
सचिन रैना ने आपली फलंदाजी सावरली ..
आणि पाकड्यान समोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली ..
मोक्याच्या क्षणी भजी, मुनाफ, नेहरा, युवराज आणि झहीर ची गोलंदाची  बहरली ..
एक एक करून सगळ्या पाकिस्तानच्या फलंदाजांची दांडी गुल केली ..
क्षेत्र रक्षणची सुधा आपल्याला चांगली साथ लाभली..
पाकिस्तान  बरोबर विश्व चषकामध्ये कधीच नाही हरली ..
पाकड्यांना नेहमीप्रमाणे घरची वाट दाखवली ..
अन भारताने आपली शान राखली..
अन विश्व चषकाची फायनल गाठली ..
आता विश्व चषक जिंकण्याची उत्कंठा वाढली ..
आता विश्व चषक भारताचाच याची
खात्री सुद्धा मनाला पटली...
कारण एक एक करून सगळ्याच दिग्गज संघांना
भारताने धूळ चारली .. 


आता फायनल मध्ये करा लंका दहनाची तयारी..
योगायोगाने हा सामना आहे शनिवारी..
राम आणि रावण एकमेकांसमोर
जगाची हि रीतच आहे न्यारी ...
टीम इंडियाचा २८ वर्ष वनवास झाला भारी ..
बोलतात ना इतिहासाची पुनरावृत्ती होते कधीतरी..
आता पुन्हा एकदा लंका दहनाची आहे आमची पूर्ण तयारी..
नक्की पाठवू लंकेला पुन्हा एकदा माघारी...

 रामायण - २ begins.....शनिवार दुपारी २.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत..
 साभार - कवी : राहुल बाजी 
गाव .............रसायनी, रायगड..







आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


पूर्वी शब्दांपेक्षा भावनेला खूप खूप महत्व असायचे ,
कारण तेव्हा माणस भावना प्रधान होते,
पण आता शब्दांना अतिमहत्व प्राप्त झाले आहे
कारण आता माणस भावना शून्य होत चालले आहेत...
त्यामुळेच आता
...खूप वेळा खोटेच रडावं लागत
खूप वेळा खोटेच हसावं लागत
अनेक ठिकाणी खोटेच लिहाव लागत
बऱ्याच वेळी खोटेच बोलाव लागत

आणि ह्यामुळेच
हया संघर्षमय जीवनात सुखाने जगायचं असेल
तर मन दगडाचे असाव लागत ...

साभार - लेखक : राहुल बाजी
गाव .............रसायनी, रायगड...



आज माझ्या लेकीची वार्षिक परीक्षा सुरु होणार होती. माझ्या सासूबाई तिला सहजच बोलून गेल्या कि, "जायच्या आधी देवाला नमस्कार कर म्हणजे देव तुला चांगली बुद्धी देईल. "
"आजी आज अस काय विशेष आहे कि मला आजच चांगल्या बुद्धीची गरज आहे? ती तर मला नेहमी लागणारच." माझी लेक म्हणाली.
"आग आज तुझी परीक्षा ना म्हणून म्हंटल." इति सासूबाई.
"हे बर आहे तुझ. आज कशाची तरी गरज म्हणून हात जोडायचे आणे मग गरज संपली कि विसरून जायचं. देवाला एक प्रकारे लाच देण मला नाही पटत."

लेकीच्या ह्या उत्तरावर मी मात्र खूप विचार करू लागले. मनुष्य स्वभाव कसा विचित्र आहे. गरज असेल तेंव्हा अगदी मन लावून आळवणी केली जाते आणि एकदा गरज संपली कि त्या देवाची आठवण पण राहत नाही. खरच अस का घडत असेल?
तसं पाहायला गेल तर आपल्या प्रत्येक कृतीचे चांगले वाईट परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात. देव त्याच्यात काहीच मदत करू शकत नाही. हो फार फार तर हे परिणाम झेलायची ताकत देवू शकतो.
यस मला माझे उत्तर मिळाले होते.

मला शाळेत शिकलेले भूमितीचे एक तत्व आठवले, कोणीही जड वस्तू उचलायची असेल तर ३ खांबांचा आधार लागतो. ह्या तीनही खांबांची उंची आणि आकारमान सारखेच असावे लागते. हे तीनही खांब जमिनीत एका योग्य कोनात आणि योग्य अंतरात रोवायचे असतात. ह्यातला एकही खांब जरी नीट उभा राहिला नाही किंवा वेगळ्या आकारमानाचा असेल तर वस्तू नीट उचलली जाणार नाही. जितकी वस्तू जड तितकी उंची आणि कोन अधिक.


अगदी तसंच कुठलाही निर्णय घेताना ३ खांब मजबूत असावे लागतात. पहिला खांब म्हणजे आपले ज्ञान, दुसरा खांब म्हणजे आपले संस्कार आणि तिसरा खांब म्हणजे शांत मन. हे तीनही खांब जर का मजबूत असतील तर आपल्या कृतीचा काहीही परिणाम होवो आपण तो सहज स्वीकारू शकतो.
माझ्या लेकीचे उदाहरण घेतले तर अस समजेल कि परीक्षेत जर का तिला चांगले मार्क मिळवायचे असतील तर उत्तम ज्ञान आवश्यक आहे. ते ज्ञान नसेल तर ती कदाचित काहीही लिहिणार नाही पण तिच्या वरचे संस्कार तिला कॉपी नक्कीच करू देणार नाहीत. पहिले दोन्ही खांब मजबूत असतील पण शांत मन नसेल तरी सुद्धा परिणाम शून्य. म्हणूनच असे काही करणे गरजेचे राहील कि तिला शांत मनाने परीक्षेला सामोरे जाता येईल.

हे शांत मन कोणाला देवाची आराधना करून मिळते, तर कोणाला एक सुरेल तान घेवून. तर कोणी छानसे चित्रच काढेल तर कोणी अजून काही तरी करेल. माझ्या मते जी कृती करून मनाला शांतता मिळते ती कृती म्हणजेच देवाचे एक रूप असते. म्हणूनच माझी आजी कदाचित म्हणायची कि देव हा सगळी कडे व्यापलेला आहे.

मित्रांनो मी माझ्या लेकीला समजावून सांगितलेला देवाचा अर्थ बरोबर कि चूक तुम्हाला काय वाटत?

साभार - लेखिका : राजश्री (पुणे )


असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'

 असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक  खास...

साभार - कवी : राहुल बाजी
गाव .............रसायनी, रायगड... 

आजकाल सेम कविता/लेख पोस्ट होत आहेत म्हणून मी एक कविता केली आहे. कवितेचा प्रकार मला माहित नाही. तुम्हाला "प्रेमात पडलं की सारेच जण..." हि कविता माहित आहे का? तिचा आधार घेवून मी खालील कविता केली आहे.
- राजश्री

गूगल ग्रुप जॉईन केला कि, सगळे जन कविता कॉपी-पेस्ट करायला लागतात
खर सांगायचं झाल तर आपणच कवी असल्यासारख दाखवतात

यात चुकीचे अस काहीच नाही, सगळ्याच कविता असतात खूप छान
आपल्याला कविता येत नाही.... याचे येते भान

रात्र न दिवस कविता करण्याचे, विचार छळू लागतात
मग आपल्याच मर्यादा ....आपल्याला कळू लागतात

डोळ्याला डोळा लागत नाही, एकाकी रात्री खायला उठतात
ओठावर आलेले शब्द, कवितेत उतरताना मात्र फटकून वागतात.

कठोर वाटणार सत्य हि, हळू हळू स्वीकारतात
खर सांगते  कवी होण्याचे निरनिराळे पर्याय शोधतात

स्वप्नपूर्तीचे मार्ग शोधताना रात्र रात्र जळतात
गूगल ग्रुप जॉईन केला कि, सगळे जन कविता कॉपी-पेस्ट करायला लागतात

साभार - कवियेत्री : राजश्री ( पुणे )


तो येणार तेव्हा 
मन खूप बेचैन व्हावं ..
भेटायची ओढ खूप 
पण मनात खूप चलबिचल व्हावं...

घाबरून का होईना पण 
स्वतःला सजवण्याचा प्रयत्न मी करावा ..
वेळ विचार करण्यातच गेला तरी 
मी प्रेमाच्या शृंगाराने  न्हाव  ..

समोर त्याच्या जाव 
तेव्हा आणखीच घाबराव ..
त्याने बघून मग 
मला हळूच मिठीत घ्यावं ..

नसले मी सुंदर जरी 
त्याने मला वर्णाव ..
हातात माझा हात धरून 
मग ते मला ऐकवाव ..


असा  कोणी माझ्यापण 
आयुष्यात यावा ..
ओठावरच्या या शब्दांना 
त्याने पण कधी ऐकाव ..
साभार - कवियेत्री : रुची

एकदा विमानातुन एक पोपट आणि एक कुत्रा प्रवास करत असतात. पोपट एअर होस्टेसला बोलावतो.

एअर होस्टेस येते, "येस सर?"

"काही नाही, काही नाही, तु जा परत...", पोपट म्हणतो. असे ३-४ वेळा होते.
कुत्रा हे सगळे बघत असतो. न राहावल्याने तो पोपटाला विचारतो,
"काय रे, हे काय चाललय??"
पोपट म्हणतो, "काय नाय रे.. असच...
मज्जा ..."

कुत्रा विचार करतो, आयला! एवढासा पोपट आणि माज करतोय ???
मग कुत्राही असेच एअर होस्टेसला बोलावुन परत पाठवायला लागतो.
आणि पोपटाकडे बघुन म्हणतो, "असच...
मज्जा ...!"
पोपट आणि कुत्र्याचे हे चाळे बघुन स्टाफ त्यांना तंबी देतो.
तरीही न रहावुन पोपट पुन्हा एकदा एअर होस्टेसला बोलावुन परत पाठवतो.
या वेळी कॅप्टन स्वत: येउन दोघांनाही परत तंबी देतो,
"पुन्हा असं घडलं तर आम्ही गंभीर दखल घेऊ..."
आता कुत्र्याला रहावत नाही. तो पुन्हा हाच प्रकार करतो.
शेवटी सगळा स्टाफ जमा होतो आणि ३०००० फुट उंचीवरुन
पोपट आणि कुत्रा - दोघांनाही विमानातुन खाली फेकुन देतात.
पडता-पडता पोपट कुत्र्याला विचारतो,

"काय रे, तुला उडता येतं का?"
"नाही रे" कुत्रा म्हणतो.
"मग? माज कशाचा करत होतास???"  :-D :-D :-D
 


ती : आपण काही झाले तरी लग्न करतो आहोत, तु मला वचन दे. नाही तर मी जीव देईन…
तो : दिले, जा. तथास्तु !
ती : हे बघ, मला हे तुझे तथास्तु नाही आवडत..
तो : सवय, संकृत मधला हाच एक शब्द येतो मला.
ती : पण कधी कधी बोलले खरं होते रे..
तो : हो माहीत आहे.
ती : मग का ?
तो : माहीत नाही..

**
**********************************************
ती : आपण लग्न कधी करतो आहोत रे ?
तो : लवकरच गं.. तुझ्या घरी बोलतो मी एकदा लवकरच.
ती : ह्म्म, मी वाट पाहत आहे..
तो : लवकरच होईल, हो म्हणतील अथवा नाही…
ती : मी तयार आहे.
तो : मी देखील.
ती : तीला सांगितले आहेस का तु ?
तो : हो गं, सांगितले आहे, तीच माझ्याबरोबर घरी येईल तुझ्या.
ती : मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे..
तो : मी देखील, व तुला माझ्या आधी जाऊ देणार देखील नाही..
ती : असे कसे होईल..
तो : होईल म्हणलो ना ? मग होईल.
ती : नाही झाले तर, तु जर नाही मिळालास तर आधी मी जाईन, तथास्तु !!
तो : हे… काय हा फालतुपणा…
ती : चिढलास काय रे ?
तो : नाही, पण वेडेवाकडे नको बोलत जाऊ…
ती : ठीक आहे, स्वारी.
************************************************
तो : कुठे आहेस गं ?
ती : अरे मी ऑफिसमधून निघते आहे.
तो : मी गेलो होतो घरी आज तुझ्या…मनाची तयारी कर.. आपण दुसरा मार्ग अवलंबतो आहोत.
ती : काय ? बाबा नाही म्हणाले का ?
तो : हो, धक्के मारुन बाहेर काढलं.
ती : काय ? असे कसे करतील ते ? त्यांनी तर मला हो म्हणाले होते..
तो : होतं कसं कधी कधी..
ती : पण आपल्याच बरोबर का ?
तो : तुला पुन्हा विचार करायचा आहे का ?
ती : नाही.
तो : मग मी वाट पाहतो आहे तुझ्या उत्तराची. आज पासून ४ दिवसानंतर कोर्ट जवळ भेट.
ती : हो. काय घेऊन येऊ ?
तो : जशी असशील तशी ये. काही घेण्याची गरज नाही आहे. नोंदणी करतो मी आज सेटींग लावता आली तर बघतो.
ती : खरंच. मी एकदा बोलू का घरी ?
तो : ह्म्म. तुझी इच्छा.. !
ती : मी ट्राय करते, नाही तर प्लान आहे तसाच.
************************************************
तो : सेटिंग झाले आहे, ३० दिवसाची वाट बघावी लागणार नाही.
ती : ह्म्म…
तो : सगळी तयारी झाली आहे, नोंदणी झाली की आपण मंदिरात जाऊ.
ती : ह्म्म्म..
तो : वेळेची काळजी घे, तुझे बाबा कळाल्या क्षणी रुद्रावतार मध्ये येतील.
ती : ह्म्म…
तो : मी गीता सांगत नाही आहे तुला..
ती : हम्म्म…
तो : काय झाले कोणी आहे का बरोबर ?
ती : ह्म्म.. नाही विचार करते आहे..
तो : आता विचार ? ह्या स्टेपला ?
ती : तो नाही रे.. घरचा…
तो : मग ठीक आहे… भेटू उद्या.
************************************************
तो : निघते आहेस ?
ती : हो निघाले..
तो : घरी बोललीस ?
ती : हो.. जाऊ दे..
तो : तु एकुलती एक आहेस… पुन्हा विचार कर वेळ आहे..
ती : केला मी विचार तथास्तु !!
तो : माझेच शब्द मलाच ?
ती : हो..
तो : तुझा हा अवखळपणाच माझा जीव घेतो..हे… लक्ष्यात आहे ना..
ती : हो.. सगळे तयार आहे.
तो : मी पोहचतेच आहे.
************************************************
तो मित्र : अरे एक लफडा झाला रे…
तो : काय झाले रे आता ?
तो मित्र : अरे कोणी तरी नेता गचकला आहे. सरकारी ऑफिसला सुट्टी दिली आहे.
तो : अबे…
************************************************
तो : अग एक अडण आली आहे.
ती : काय झाले रे ?
तो : कोर्ट आज बंद आहे..
ती : अरे देवा..
तो : काय झाले..
ती : मी घरी चिठ्ठी सोडून आलो रे…
तो : ओह नो.. तुला काय बोलू आता मी…
ती : स्वारी.. काय करु मी आता..
तो : वाचली असेल का घरी कोणी आता ?
ती : मी टिव्ही समोर ठेवली होती.. आई आली असेल घरी..
तो : ओह.. बरं ठीक आहे मी बोलतो तिच्याशी.. ती मार्ग काढेल.
ती : ठीक आहे मी वाट पाहते आहे तुझी…
************************************************
तो : आपण आताच्या आता मनालीला जातो आहोत..
ती : काय ?
तो : हो..
ती : बरं…कोण कोण ?
तो : ती, तीची फॅमिली व आपण दोघे. गाडी घेऊन.. तीची.
ती : बरं. कुठे भेटू ?
तो : मी तुला भेटतो, एक तासात. मॉल समोर उभी रहा.
************************************************
ती : तु ड्राईव्ह कर ना थोडा वेळ ती दमली आहे..
तो : हो, करतो आहे थांबू थोडावेळाने पुढे तेव्हा मी करेन..
ती : तु गाडी पुढील धाब्यावर थांबव गं…पुढील आठवड्यात आपलं लग्न होईल..
तो : ह्म्म्म… होईल १००% होईल..
ती : तुम्ही का हसताय.. बघ ना रे…. कसे हसत आहेत ते..
तो : लहान आहेत गं..
ती : अरे… समोर बघ…………….. गाडी………… डिव्हाडर..
************************************************
धडाधडा… समोर चिता जळत होती..
सगळेच सुन्न असे कसे झाले..
त्याला कोणी सांगायचे ? कसे…
तिच्या आई वडिलांचा आक्रोश पाहिलास…
कोण समजावेल रे त्यांना एकुलती एक…
हो तो पण एकुलता एक… तो पण होता..
वाचला नशीबाने..
************************************************
डॉक्टर म्हणत आहेत वेड लागले आहे..
नाही वाटत यार.. त्याचे डोळे बघ ना..
पण तो एकच शब्द म्हणतो आहे पुन्हा पुन्हा..
तथास्तु !
*
*
*

तीने आपले वचन पुर्ण केले….
















खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 

होते ते प्रेम कधी बालपणात
तिच्या हसण्यात आणि लाजुन बघण्यात
समज नसते त्या प्रेमाची
त्या आतील नात्यांची
लहानपनी तरी कधी जाणवते का??????......
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 
 
प्रेमात लोक आंधळी होतात
पण जे प्रेम करतात तेच समजतात
पाहिले प्रेम हे काय आहे
दुधा शिवाय पाण्याला आलेली साय आहे
प्रेम हे वया प्रमाणे बदलते का??????
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 
 
ज्यांना भेटते ते असतात सुखी
पण न मिळाले म्हणुन रहायचे का दू:खी
हा तर नशिबाचा खेळ आहे
आणि नशिबाने घातलेला मेळ आहे
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 
 
माणसाने आयुष्यात कधी तरी प्रेम करावे
पण ते जर दूर गेले तर आयुष्यभर जपावे..
.
.
.
.
खरचं पाहिले प्रेम आयुष्यात मिळते का???????? पण ते प्रेम आयुष्य भर राहते का????? 
 
 
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :P 
----------------------------------------------------------------------

स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स

स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं

ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न

ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट
 -----------------------------------------------------------------
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.


चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'
 ----------------------------------------------------------------------------------
एकदा सांताला  त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.

' आय मिस यू!'

  सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,

' आय मिस्टर यू!!'

-----------------------------------------------------------------------------------------

बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.
 ----------------------------------------------------------------------------------------
झंप्या   : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.

डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?

झंप्या : वॉकमन लावल्यावर!
 -------------------------------------------------------------------------------

शिरप्याचं गाढव हरवलं. तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला.

गणा : काय रं शिरप्या, तुझं गाढव हरवलं आनि तरी बी तू देवाचे आभार मानतुयंस?

शिरप्या : आरं बाबा, देवाचीच किरपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, न्हाय तर मी बी हरवलो असतो की.
 -------------------------------------------------------------------------------
पती : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस?

पत्नी : कसं काय?

पती : माहेरी जाऊन!!
 -------------------------------------------------------------------------------
न्यूटनचा मृत्यू कसा झाला???
.
.
.
.
.
त्याने रजनीकांतचे पिक्चर बघितले आणि आपण स्वत: तयार केलेल्या नियमांची वाट लागताना बघून त्याला धक्का बसला :D :D

------------------------------------------------------------------------------------
बांता  : अरे, या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं?


सांता  : काय कळतं?

बांता  : की, आप देख रहे है 'स्टार प्लस'?
 ----------------------------------------------------------------------------------------
गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?

बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!

गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?

बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!!
 -----------------------------------------------------------------------------------------
अभिषेक बच्चन :तुला माहित आहे का माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते ?
ऐश :- No idea.
अभिषेक:  Get idea
.
.
.
ऐश :गप्प माकडा :D :D :D
 ---------------------------------------------------------------------------
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


akshay virulkarm  9175725337 hi dost

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......